Skip to main content

टपरीवरच्या ओव्या

टपरीवरच्या ओव्या

अरे शिक्षक शिक्षक
जणू घाण्याचा बैल
सदा कदा ONLINE
घरी वैतागली बाईल

अरे शिक्षक शिक्षक
WHATSAPP WHATSAPP खेळ
ONLINE च्या नादामंदी
बिघडलाय सारा मेळ

अरे शिक्षक शिक्षक
कसा शिजवतो खिचडी
वाट पाहून कंटाळली
वर्गातली बछडी

अरे शिक्षक शिक्षक
कोणी होई वार्ताहर
पुढार्यांचे  काढी फोटो
शाळा पडते मोकार

अरे शिक्षक शिक्षक
साहेबाला हिंडवीतो
जो इमाने काम करी
त्याला कारे भंडावीतो

अरे शिक्षक शिक्षक
नाही चालत वेबसाईट
म्हणून बारमध्ये
होतो बिचारा टाईट

अरे शिक्षक शिक्षक
लई दिवस वाईट
जरी चालली साईट
नाही टिकत लाईट

अरे शिक्षक शिक्षक
त्याला किती टेन्शन
जल्म्भर खपून भागून
नाही त्याला पेन्शन
RMESH WAGH

9921816183

Comments

Popular posts from this blog

असा तो...

  असा तो... तो एकटाच रस्त्याने तंद्रीतच चालत असतो दर दोन पावलावर सारखा सारखा वळत असतो याच्या चपला कायमच झिजलेल्या खरबुड्या फाटल्या तरी शिवून शिवून पुन्हा त्याच घालत असतो रोज खड्ड्यांचा रस्ता तो तसाच तुडवत असतो मागून येणाऱ्या बाईकची उगीच वाट पाहत असतो मुलगा लहान असताना नाही घेतली सायकल आता मुलगा बी.फार्म.झालाय हा उगीच खिसा चाळत असतो उदास झालीत सारी स्वप्ने त्याच्या नवरीने पाहिलेली हा आश्वासने उसनी बिचारीला देत असतो   तो १५ वर्षापासून विनानुदानित शाळेत शिक्षक आहे सगळ्याच कथेतला दरिद्री नायक शेतकरी असत नसतो                  रमेश वाघ,पेठ,नाशिक,                  ९९२१८१६१८३

काव्य

काव्य जस जसे माझे यौवन सरू लागले तस तसे मला काव्य स्फुरू लागले ||१|| कोरडेच निघाले पावसाचे नक्षत्र सारे आता कुठे जरासे मेघ झरू लागले ||२|| सोडला सहज हातातला तेव्हा आता कुठे आठवांनी नेत्र पाझरू लागले ||३|| ऐकलेना कधी गीत प्रणयाचे तेव्हा उगाच आज आता तुझे बोल स्मरू लागले ||४|| कवटाळल्या गारगोटी लाथाळून माणिकमोती स्वार्थी आप्त सारे आता विसरू लागले ||५|| रमेश वाघ, नाशिक.९९२१८१६१८३ आमचे हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!

दुर्दैवाने आज पुन्हा सापडलाय सरस्वती आणि सुदाम मुंडेचा वारस हा स्त्री सक्षमीकरणाचा गर्भपात नाही मानुसाकीचाच गर्भपात झालाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! ज्यांचा HDI जास्त, GDP जास्त ज्यांच्या श्रीमंतीचा बोलबाला झालाय तिथेच आज नीचपणा घडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! न जाणो किती जिजाऊ सावित्री आणि अहिल्या असतील त्या निरागसांत कदाचित उद्याची सानिया ,साक्षी आणि सायनाही ......पण.... ह्या नराधमाने भविष्यकाळाच गाडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! फुले शाहू आंबेडकर टिळक रानडे आगरकर यांच्या वैचारिक संचिताचा वारसा आम्ही कधीच सोडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! कसं सांगू हा महाराष्ट्र शिवबा,तुकोबा अन विनोबाचा आहे अरे त्या महत्म्यांचा आत्माही स्वर्गामध्ये अवघडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!! हे स्वर्गस्थ महात्म्यांनो!!!! जमले तर माफ करा आम्हाला सगळ्या क्षेत्रातला आमचा INDEX जरी वाढलाय पण तुम्ही रुजवलेला विवेकाचा कोंब आम्ही खुडलाय व्हय महाराष्ट्र गाभडलाय.........!!!!    ...